पुसेगाव : ( विशाल सूर्यवंशी ) जिहे-कठापूर उपसा सिंचन योजना पुन्हा कार्यान्वित व्हावी या मागणीसाठी पुकारलेला बंदला खटाव तालुक्यातील उत्तर भागात १००% प्रतिसाद मिळाला.पुसेगाव ,खटाव बुध,डिस्कळ ,निढळ,वर्धनगड , आदी गावातूनही प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने शिवसेनेच्या या लढाईला नागरीकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने जिहे कठापूर प्रश्नी दबाव निर्माण करण्यात उफजिल्हा प्रमुख प्रताप जाधव यशस्वी ठरल्याचे पिहायला मिळाले
जिहे कठापूर उपसा सिंच योजना,शेती मालाला हमीभाव व वाढती महागाई यासह विविध प्रश्नांविरोधात खटाव तालुका शिवसेनेच्यावतीने मोळ ते वर्धनगड अशी पदयात्रा झाली तर गेल्या दोन दिवसापासून वर्धनगड बोगदा येथे ठिय्या आंदोलन झाले.पण प्रशासनाशी बोलणी फिस्कटल्याने शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी खटाव तालुका बंदची हाक देण्यात आली या बंदला कॉग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जाहीर पाठिंबा दिल्याने बंद १०० % यशस्वी झाल्याचे पाहायला मिळाले.
यावेळी शिवसेना खटाव तालुका यांच्या वतिने पुसेगाव पोलिस स्टेशनचे सपोनि संभाजीराव गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख दिनेश देवकर,महीला आघाडीच्या सत्वशिला जाधव, महिपत डंगारे, रामदास जगदाळे, सुमित्रा शेडगे, आकाश जाधव, मुगटराव कदम, संजय घोरपडे, अस्लम शिकलगार, रामभाऊ लावंड, संजय नांगरे, मिथून ठोंबरे, साईश जाधव,नितीन सावंत, यशवंत जाधव यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
……तर वर्धनगड घाट चडू देणार नाही- प्रताप जाधव
गेल्या तीन दिवसापासून चालू आसलेल्या आंदोलनाची दखल प्रशासनाने घेतली नसल्याने शेतकरी वर्गात प्रचंड असंतोष आहे.तरी येत्या दोन दिवसात जर जिहे कठापूरचे रखलेले काम जर चालू झाले नाहीतर एकाही मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना वर्धनगड घाट चढू देणार नाही.

