सातारा (अजित जगताप) : महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन 17 दिवस झाले आहेत. त्यातच भाजप नेते मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री शिवसैनिक होईल असे सूचक विधान केले आहे. शिवबंधन घातलेल्या शिवसैनिकाला मुख्यमंत्र्याचे महाराष्ट्र राज्यातील जनता स्वागतच करेल असा विश्वास सातारा जिल्हा माजी शिवसेना जिल्हाप्रमुख हणमंत चवरे यांनी व्यक्त केला आहे.
निवडणूक झाल्यानंतर सतरा दिवस सरकार स्थापन करण्यासाठी एवढा विलंब लावला जात आहे. ही बाब काहींच्या राजकीय सतरा पिढ्यांनी अनुभवली नाही. सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 50 वर्षे महाराष्ट्र राज्यात भगवे वादळ निर्माण केले आहे. मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी मुबंईत शिवसेनेचा जन्म झाला आहे.
व्यापक दृष्टीकोन ठेवून हिंदुत्वाचा नारा दिला. त्यामुळे भाजपशी नैसर्गिक युती झाली आहे.सध्या शिवसेना व सहयोगी 64 आमदार आहेत. त्यांनी राज्यात भाजपला साथ दिली आहे. याची आठवण भाजप नेत्यांनी ठेवावी असेही श्री चवरे, रवींद्र महाडिक, आतिष ननावरे, रमेश बोराटे यांनी स्पष्ट केले आहे.
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसैनिक मुख्यमंत्री होतील हे सांगितले आहे. मात्र, हातात कमळ घेण्याऐवजी शिवबंधन बांधलेला शिवसैनिक मुख्यमंत्री असावा ही श्रीची इच्छा आहे. अब की बार, दो सो पार अशी वलग्ना करणार्या भाजपचे निवडून आलेले निम्मे आमदार हे इतर पक्ष्यातून आलेले आहेत. त्यामुळे त्यांनी खुशाल कोणालाही मंत्री करावे.पण, मुख्यमंत्री हा शिवसैनिकच असेल. त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आमदारच नाही तर राज्यातील जनता आहे. सध्या परतीच्या पावसाने राज्यातील शेतकर्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी शिवसैनिक सत्तेत सहभागी होऊन सुध्दा रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे सत्तेचा मोह शिवसेनेला नाही. पण, लोकसभा निवडणुकीत जे ठरले होते तसेच झाले पाहिजे हा आग्रह धरला आहे. म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण, काळ सोकावू नये हीच योग्य वेळ असल्याचे ही माजी जिल्हा प्रमुख चवरे, महाडिक, बोराटे, ननावरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून ज्या दिवशी मुबंई येथे शपथविधी होईल त्यादिवशी सातारा जिल्ह्यातील पाच हजार शिवसैनिक मुबंईला रवाना होतील.सातारा ही छत्रपती शिवराय यांची राजधानी होती.
जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षातून खासदार निवडून आले आहेत पण, एकदाही भाजपचे खासदार निवडून आले नाहीत.याचे भाजप नेत्यांनी आत्मचिंतन करावे असा ही सल्ला देण्यात आला आहे.
शिवबंधनातील मुख्यमंत्र्यांचे जनता स्वागत करेल : चवरे
RELATED ARTICLES

